मंगळवार, २५ जून, २०२४

 एखादा लेखक जेंव्हा लिहीत जातो, तेंव्हा कुठल्याशा एका पॉईंटवर त्याला वाटायला लागतं की आपल्याला जे मांडायचं होतं ते आपलं अगोदरच बऱ्यापैकी मांडून झालेलं आहे.


खासकरून जो लेखक स्वतःच्या लिखाणातून स्वतःलाच मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्याला हे जाणवतचं. ते जाणवत नसल्यास लेखक म्हणून तो स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही असा त्याचा अर्थ होतो.


हे जाणवणे ह्यासाठीही गरजेचे आहे की माणूस म्हणून आपली वाढ संपली आहे का, आपल्या जाणिवांना नवीन धुमारे फुटणे थांबले आहे का, बाहेरचा नवीन विचार आपल्या आत पाझरणे बंद झाले आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे सापडू शकतात. माणूस म्हणून आपला एक न बदलणारा साचा तयार झालाय का आणि तो आपल्याला सांभाळायचा आहे की मोडून टाकायचा आहे की दुरुस्त करून घ्यायचा आहे, हा चॉईसही आपल्याला करता येतो.


पण ह्यासाठी आपल्याला स्वतःशी बऱ्यापैकी प्रामाणिक असणे गरजेचे असते. शब्दांची नशा अदभुत असते, अनेकदा पोकळ शब्द मादक आणि मोहकही असतात. त्या शब्दांमागे वाजणाऱ्या टाळ्या फार सुखावणाऱ्या असतात. आपला ठरलेला साचा आणि त्या साचा मधले आपण अनेकांना आवडत असतो. आपले तसेच व्यक्त होणे सगळ्यांच्या ओळखीचे आणि सवयीचे असते. 


प्रश्न वाचकांचा नसतो, लेखकाचा असतो. 


लिहीत लिहीत संपून जायचे की थांबून थांबून जगायचे हे लेखकाने ठरवायचे असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा