बुधवार, ८ मार्च, २०१७

कित्येक वाटा अशा अज्ञात,
जिकडे पावलं वळलीच नाही,
कित्येक नाती अशी अनाथ
जी आयुष्याला कळलीचं नाही..

पावलांना ओढ आहे तोवर,
वाटांची आमंत्रण स्वीकारत जावू,
आणि जर संपली हि ईच्छा,
थकलेलं आयुष्य नाकारून पाहू..

-शैलेंद्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा